Thursday, April 30, 2015

Dr. Chandrhas Shastri writes on determining aims.

ध्येयनिश्चितिः।
॥चन्द्रहासः॥

भवतु निश्चितं लक्ष्यं
प्रत्येकस्य सुखेन हि।
समीपस्थो न वीक्ष्यः
न चाप्तोऽपि तथैव च॥

प्रत्येकाचे ध्येय त्याच्या सुखाने निश्चित व्हावे. जवळच्या किंवा नातेवाईकाला पाहून ध्येय निश्चित करू नये.

ध्येयं  सुनिश्चितव्यं तु
परीक्ष्य सर्वथा निजम्।
आकाङ्क्षा महती चास्तु
वर्जयेदति सर्वथा॥

म्हणून सर्व त-हेने स्वतःला पारखून चांगल्या प्रकारे ध्येय निश्चित करावे. आकांक्षा मोठी असावी; अति नको.

बाह्यबलेन किञ्चिद्धि
न च कार्यं कदाचन।
स्वान्तः सुखाय  सर्वं हि
करणीयं नृणा सदा॥

कधीही बाह्य बलाने कार्य करू नये. स्वान्तः सुखाय असे सर्व काही माणसाने करावे.

न जन्मना न वंशेन
कस्याग्रहेण वापि न।
केवलं क्षमताऽधारे
ध्येयस्य चयनं भवेत्॥
जन्म, वंश, कोणाचा आग्रह या आधारे नव्हे; तर केवऴ आपल्या क्षमतांच्या आधारे ध्येयाची निवड व्हावी.

Monday, April 27, 2015

Dr. Chandrhas express his gratitude for Maa Renuka.

वैशाखाचे तापते ऊन. दुपारचे दोनेक वाजलेले. जेवण राहीलेले. तरीही त्या उन्हाचा पारा जाणवत नाही, जेव्हा आपल्या मनाचा जणु आरसा; अशा मित्राचा अचानक संपर्क होतो.

ग्रीष्मातपेऽपि वैशाखे
सुखं शक्यं मतं मम।
श्रीदेवीकृपया किं न
लभते सुजनो वद॥1॥

ग्रीष्माच्या वैशाख वणव्यातही सुख लाभणे शक्य आहे; असे माझे मत आहे. श्रीदेवीकृपेने सुजनाला काय लाभत नाही, सांगा.

कर्णाभ्यां श्रूयते वाणी
जाने ह्योषधरूपिणी।
आह्लादिनी मनोज्ञा च
स्मारयन्ती कृपां मतेः॥2॥

कान औषधीसम अशा वाणीला ऐकतात. आह्लादकारी, मन जाणणारी अशी वाणी सरस्वतीच्या कृपेचे स्मरण करून देते.

दूरत्वेनाप्यदूरत्वं
मित्रस्य लक्षणं महत्।
तत्र च क्षेमचिन्ता या
पताका सुहृदः परा॥3॥

दूर असूनही समीपता हे मित्राचे मोठे लक्षण आहे. आणि तेथे जी कुशलचिंता; ती तर मित्राची जणु पताकाच!

मुकं स्थित्वापि कम्पन्ती
चित्तजवनिका तथा।
यथा विहाय नादं सा
पताका कम्पतीह वै॥4॥

जसे नादा विना पताका हलते, तसे मौन राहूनही चित्त पटल कंपित होते.

धन्योऽस्मि ते कृपां प्राप्य
चास्मिन् जन्मनि मातृके।
जन्मान्तरेऽपि दासं मां
न विस्मरतु रेणुके॥

हे माते, या जन्मात तुझी कृपा प्राप्त होवून मी धन्य झालो. हे रेणुके, पुढच्या जन्मीही मला दासाला विसरू नकोस.

Saturday, April 25, 2015

Dr. Chandrhas shastri writes on aesthetics

॥सौन्दर्यगीतम्॥
॥चन्द्रहासः॥

अध्यात्मं चानुरागश्च
सौन्दर्यं वर्तते तयोः।
व्यष्टिभावेन रागश्च
समष्टिभावना परे॥
अध्यात्म आणि अनुराग म्हणजे स्नेह या दोहोंतही सौन्दर्य असते. व्यक्तिभावाने स्नेह तर समाजभावनेने अध्यात्म साधले जाते.

इन्द्रियसन्निकर्षे तद्
सौन्दर्यं क्षणमोददम् ।
भवति तदिदं भक्त्यां
कालातीतप्रमोददम्॥
नेत्र, मन इ. इंद्रियसंबंधात जे सौंदर्य क्षणिक आनंद देते. ते हे सौंदर्य भक्तीसंबंधाने मात्र कालजयी व  प्रकर्षाने आनंद देणारे ठरते.

आनन्दः स्थायिभावोऽस्ति
सौन्दर्यस्य तु सर्वथा।
क्षणाय वा चिराय स्यात्
निश्चितव्यं त्वया प्रिय॥
मित्रा, आनंद हा सौन्दर्याचा सर्वथा स्थायीभाव आहे. हा आनंद क्षणासाठी हवा की अनंत कालासाठी हे तुला निश्चित करावयाचे आहे.

शक्तिरूपं हि सौन्दर्यं
शक्तियुक्ताय वर्तते।
तस्मादेव समुक्तं यद्
वीरा भोग्या वसुन्धरा॥
शक्तिरूप असे हे सौंदर्य शक्तियुक्तासाठी म्हणजे सामर्थ्यवानासाठी असते. म्हणूनच म्हटले जाते की,
वीरा भोग्या वसुन्धरा.

गीत्वा सौन्दर्यगीतं वै
हासस्तु मुदितः स्वयम्।
यथा मुदति चन्द्रोऽयं
स्वकलयाम्बरे स्थितः॥
जसे चंद्र आपल्या कलेने आकाशात स्थित होवून आनंदित होतो, तसे हे सौंदर्यगीत गाऊन हास स्वतः आनंदित झाला.

Wednesday, April 22, 2015

Dr. Chandrhas Shastri writes on cause of joy.

युक्तनियमः।
॥चन्द्रहासः॥

इतोऽप्यल्पाधिकस्येच्छा
विनाशकारिणी खलु।
पर्याप्तभावना या सा
सर्वसुखस्य कारणम्॥1॥

याहून(प्राप्ताहून) अल्प अशाअधिकाची इच्छा खरोखर विनाशकारिणी होय. हे पुरेसे आहे, अशी भावना सर्वसुखाचे कारण आहे.

भवेन्निवारणं पापस्य
तमाभावोऽपि निश्चितः।
तस्माद्घटस्तु पुण्येन
पूर्णो भवेन्न संशयः॥2॥

यामुळे पापाचे निवारण होईल, अज्ञानाचा नाश होईल; हे निश्चित. त्यामुळे पुण्याने घट पूर्ण होईल; यात संशय नाही.

व्यष्टेः कृते यमो युक्तो
यद्यपि नात्र संशयः।
समष्ट्यर्थं च राष्ट्राय
भिन्नोऽपि स्यात् कदापि वा॥3॥

हा नियम व्यक्तीसाठी उपयुक्त आहे. समाज व राष्ट्रासाठी मात्र याहून भिन्न असा नियम कधीही असू शकतो.

निधाय हृदि संपूर्णा
श्रद्धा मातृकृपायां च।
यद्दत्तं च तया मह्यं
मन्तव्यममृतं हि तद्॥4॥

मनात मातृकृपेवर श्रद्धा ठेवून जे तिने मला दिले आहे, ते अमृत मानावे.

Monday, April 6, 2015

Dr. Chandrhas writes on fame achieved by only criticism.

संरचनं तथापि च।
॥चन्द्रहासः॥

सुलभं निन्दनं लोके
तस्मादप्युपदेशनम्।
दुर्लभं तु सहाय्यं च
संरचनं तथापि च॥

निंदा करणे सुलभ. त्याहून उपदेश करणे सुलभ. सहाय्य दुर्लभ त्याहून संरचन म्हणजे सृजन दुर्लभ.

निन्दनाल्लभ्यते ख्यातिः
व्यर्था निरुपयोगिनी।
विहाय कर्मणाऽदेशः
शवशृङ्गारवद्धि सः॥

निंदा करून मिळालेली प्रसिद्धी व्यर्थ व निरुपयोगी असते. कृतीविना उपदेश म्हणजे जणु प्रेताचा शृंगार.

आवश्यकं यथाशक्यं
संरचनं च संहतिः।
ततः हेतुर्भवेत् सिद्धः
पूर्णं भवेन्मनोरथम्॥

यथा शक्य संरचन व संघटन आवश्यक आहे. तरच हेतु सिद्ध होईल आणि मनोरथ पूर्ण होईल.

Saturday, April 4, 2015

पुनर्नवं चराम्यग्रे॥ चन्द्रहासः॥

हे भगवत्त्वया दत्तं
यत् तन्मया प्रसेवितम्।
प्रसादात्ते प्रसादं च
सेवितोऽस्मीति माधव ॥

या संयमस्य दीक्षा तु
दत्ता मह्यं त्वया तया।
पुनर्नवं चराम्यग्रे
तात कृपां कुरुष्व वै ॥

यथा स्नेहस्तथा क्रोध
स्तवोपरि प्रजायते।
स्मरामि त्वां नमामि त्वाम्
मधुसूदन पाहि माम् ॥

या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......

  (फोटो साभार आंतरजाल / समाजमाध्यम) या फोटोची एक सुंदर, छोटीशी गोष्ट......  खरं तर हा फोटो यापूर्वी देखील मी अनेकदा पाहिलाय. दर्शन घेतलंय. आ...